Coconut Price Hike : नारळ महागले; प्रति नगाचा दर पन्नाशी पार

सिंधुदुर्ग : प्रतिकूल हवामान आणि झाडांवर बुरशी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणातील स्थानिक बाजारपेठेत नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एका मोठ्या नारळाची किंमत ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.


कोकणात स्वयंपाकासाठी तसेच देव आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नारळाचा वापर होतो. शिवाय कोकणात किनारपट्टी भागातली जमीन आणि खारी हवा नारळ लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड आहे. मात्र सध्या प्रतिकूल वातावरण आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या सहा महिन्यात नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे.






हवामानात सातत्यान होणारे बदल, अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या लहरी परिस्थितीमुळे नारळाच्या झाडांवर बुरशीजन्य तसच कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोळी रोग, शिवाय खोड कीड आणि भुंगा अशा किड रोगांचा प्रादुर्भाव नारळ झाडांवर झाल्याच दिसून येत. या रोगामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फळ गळती, फळांचा आकार लहान होणे, फळ कुजून जाणं नारळाला फुलोरा न येणे असे परिणाम दिसून येतात सहाजिकच स्थानिक नारळाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे त्यामुळे नारळाचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.


कोकणातल्या बाजारपेठांमध्ये स्थानिक नारळांबरोबरच कर्नाटक आणि केरळ या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नारळ आयात केला जातो. मात्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या किनाऱ्याकडच्या राज्यात सुद्धा नारळ उत्पादनाची अशीच परिस्थिती असल्याचे नारळ व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीतच देशभरातच नारळ उत्पादन कमी झाले आहे, त्याचा सुद्धा परिणाम नारळाच्या किमती वाढीत झाला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क