काळाकिल्ला आगारातील बेस्ट बस चालकांचे काम बंद आंदोलन

पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल


मुंबई : काही दिवसापूर्वीच काम बंद आंदोलन करून लोकांना वेठीस धरणाऱ्या बेस्ट उपक्रमातील आणखी एका कंत्राटदाराच्या बस चालकांनी गुरुवारी प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम केले. गुरुवारी धारावीशेजारील काळाकिल्ला आगारामध्ये पगार न मिळाल्याने दुपारपासून ओलेक्ट्रा बस कंपनीचे १०० हून अधिक चालकांनी बस आगाराबाहेर न काढता काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे दुपारनंतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.


या आगारातील बसेस सायन हुन वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. तब्बल ६० बसेस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. पगार त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत त्यांचा संप सुरूच राहील असे बस चालकांचे म्हणणे होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते.


बेस्टच्या धारावीतील काळा किल्ला आगारातील बस चालकांनी आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून अचानक बस गाड्या बंद केल्या त्यामुळे या आगारातील वातानुकूलित मोठ्या व मिडी बस आगारातच उभ्या राहिल्या त्याचा परिणाम भाईंदर ठाणे कुलाबा माझगांव येथे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला . काळा किल्ला बस आगारामार्फत भाईंदर ठाणे बॅलार्ड पियर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ओलेक्ट्रा कंपनीच्या बस गाड्या सोडण्यात येतात. या बस बंद राहिल्याने मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला .


बेस्टने या मार्गावर स्वतःच्या बस गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न खूपच तोकडा होता . त्यामुळे इतर बस गाड्यांवरील प्रवाशांचे हाल झाले . अशा वारंवार होणाऱ्या संपामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. बेस्ट प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार मिळाला नव्हता त्याकडे बेस्ट प्रशासनाने दुर्लक्ष केले व अचानक संपाला मात्र प्रवाशांना तोंड द्यावे लागते हे नेहमीच घडत असून आता तरी बेस्ट उपक्रमाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माझी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.


दोन दिवसांपूर्वी प्रतीक्षा नगर आणि धारावी डेपोच्या ११० बसेस सकाळपासून दुपारपर्यंत रस्त्यावर आल्या नव्हत्या. आता धारावी कलाकिल्ला डेपोच्या बसेसही रस्त्यावर आल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांत बेस्टची स्थिती खालावत चालली आहे. दररोज ३५ लाख प्रवासी बेस्ट बसेसमधून प्रवास करतात. संपामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि बेस्टलाही महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑलेक्ट्रा कंपनीला चालकांच्या खात्यात लवकरात लवकर पगार जमा करून बसेसचे कामकाज सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. प्रवाशांचा त्रास पाहून बेस्टने घाईघाईने ३० अतिरिक्त चालकांची नियुक्ती करून बसेस सुरू केल्या .

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल