मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जमीन ३१ जानेवारीपर्यंत सुपूर्द करणार

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत ५.२५ एकर जमिनीचा भाग सुपूर्द करणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.


राज्य सरकारने न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, पहिल्या टप्प्यात ४.३९ एकर जमीन ऑक्टोबर २०२४ मध्ये उच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यातील ५.२५ एकर जमिनीचा ताबा डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत देण्यात येणार होती. मात्र काही अडचणींमुळे जमीन हस्तांतरण झाले नाही.



महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले की, ५.२५ एकर जमीन ताब्यात देण्यासाठी पावले उचलण्यात आली असून अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. आम्ही ३१ जानेवारीपर्यंत वेळ मागत आहोत, या मुदतीत जमीन हस्तांतरित केली जाईल, असे सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.


महाधिवक्ता म्हणाले की, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी देखील पावले उचलली गेली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या संकुलाच्या बांधकामासाठी डिसेंबरपर्यंत जमिनीचा पुढील भाग सुपूर्द करतील. राज्य सरकारने ३०.१६ एकर जमिनीचा ताबा टप्प्याटप्प्याने उच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल, असे सांगितले होते.

Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला