कर्माचे फळ, अनुकूल की प्रतिकूल?

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


मी या आधीही सांगितले आहे की तुम्ही कर्म केलेत की प्रतिक्रिया ही होतेच, मग ती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. उदाहरणार्थ, आपण प्रवासाला निघालो. तिकीट काढले, बाकी सर्व तयारी केली. पण अचानक कोणीतरी मोर्चा काढतो. सगळे रस्ते जाम. आपण अडकलो, पुढेही जाता येत नाही व मागेही येता येत नाही आणि मग गाडी चुकते. इथे आपल्याला अनुकूल फळ मिळाले नाही. या प्रमाणेच कर्माचे फळ हे मिळतेच, मग ते अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या वचनाचा अर्थ आम्ही असा सांगतो.



निसर्गाचे नियम तुम्ही कर्म केलेत की लगेच सक्रिय होतात. हे असे निसर्गाचे नियम किती आहेत? परमेश्वर जसा अनंत आहे, तसेच निसर्गाचे नियम ही अनंत आहेत. आपल्याला त्यातले फार थोडे माहीत आहेत. जे माहीत आहेत, त्यानेच एवढी प्रगती झाली आहे. जर सगळे माहीत झाले तर किती प्रगती होईल. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण शक्ती पूर्वीही होती. अगदी रामायण, महाभारत काळापासून ते आजपर्यंत आहे, पण तिचा शोध कोणी लावला. न्यूटनने तिचा शोध लावला, म्हणून त्याला Invention म्हणत नाही, तर Discovery म्हणतात. जे होते ते शोधून काढणे म्हणजे Discovery म्हणतात. मी हे का सांगतो आहे? निसर्गाचे जे अनंत नियम आहेत ते शोधून काढून मानवजात अधिक प्रगती करू शकते.


या निसर्गाच्या नियमांप्रमाणेच जीवनमूल्ये ठरत असतात. असे हे निसर्गाचे नियम मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. तेच लक्षात न घेतल्यामुळे परमेश्वराबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत. त्यातूनच धर्मांतर, धर्माच्या नावाखाली छळ आणि इतर अनेक अनिष्ट गोष्टी निर्माण झाल्या. ज्या या आधीही झाल्या होत्या, आताही होत आहेत, योग्य उपाययोजना झाली नाही तर पुढेही होतच राहतील. प्रत्यक्षात परमेश्वराच्या हातात कृपा किंवा कोप करणे नाही तर निसर्ग नियमांप्रमाणेच आपल्या कर्माप्रमाणेच कृपा किंवा कोप होतो. तुमचे कर्म व निसर्ग नियम यावरच तुम्हाला अनुकूल किंवा प्रतिकूल फळ मिळणार हे अवलंबून आहे. ही महत्त्वाची गोष्ट एकदा लक्षात आली की किती तरी गोष्टींचा उलगडा होतो.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन