बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा

नवी दिल्ली : बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. लोकसेवा आयोगाने बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक झाल्याचे आढळल्यानंतर पूजा खेडकरला निलंबित केले. पूजाला आयएएस तसेच सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवांच्या परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर बनावट कागदपत्रांच्याआधारे फसवणूक केल्याप्रकरणी पूजा विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली. या प्रकरणात पूजाला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल.



पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर अटकेचे संकट टाळण्यासाठी पूजाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत पूजा खेडकर प्रकरणी पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन