'महायुतीत चौथ्या सहकाऱ्याची गरज नाही'

  99

मुंबई : आम्हा तिघांच्या महायुतीमध्ये चौथ्या सहकाऱ्याची गरज नसून, शेवटपर्यंत महाराष्ट्रात आमची महायुतीच राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. यामुळे मविआ सोडून उद्धव ठाकरेंचा गट महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.



उद्धव गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, 'काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचे असते. कौतुकांबाबत सतर्क राहायचे असते. अनेकदा राजकारणात फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केले जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत'; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



उद्धव ठाकरे गटाचा भविष्यात महायुतीत समावेश करण्याबाबत विचार होऊ शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर देताना 'आमच्या तीन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. त्यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील'; असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

'आम्हाला मिळालेले पद हे पद नसून, ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकाऱ्याच्या यादीत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे'; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशसेवा आणि समाजसेवा करण्याचे संस्कार लहानपणीच संघाच्या शाखेत जायचो तेव्हा झाले असल्याचे फडणवीस म्हणाले.
Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची