भारताचा हा क्रिकेटर गुडघे टेकत चढला तिरूपती मंदिराच्या पायऱ्या

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंची नावे पाहायला मिळाली.यासोबतच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या मेलबर्न कसोटी गाजवणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचाही या संघात समावेश आहे. त्यांनतर आता नितीश गुडघ्यावर पायऱ्या चढत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ तिरुपती मंदिराचा आहे.


भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनी नुकतेच इंग्लंड मालिकेपूर्वी तिरुपती मंदिराला भेट दिली. नितीशच्या वडिलांचे स्वप्न होते की, त्यांचा मुलगा एके दिवशी टीम इंडियासाठी खेळेल, जे अखेर पूर्ण झाले.ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर नितीश भारतात परतला आहे. त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, तो आता देवाचे दर्शन घेण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला.नितीशने गुडघे टेकत पायऱ्या चढून भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. नितीशने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा भक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तिरुपती मंदिरात एकूण ३५५० पायऱ्या आहेत ज्या १२ किलोमीटरचे अंतर कापतात.


 


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसेल. रेड्डीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा नितीश कुमार रेड्डी हा चौथा आणि दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने ९ डावात ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या. ज्यात एका शानदार शतकाचाही समावेश होता. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात नितीशने १८९ चेंडूत ६०.३१ च्या स्ट्राईक रेटने ११४ धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. आता त्याचा प्रयत्न इंग्लंडविरुद्ध बॅट आणि बॉलने चमत्कार करण्याचा असेल.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र