Chhatrapati Sambhaji Nagar : कॉलर उडवणं आणि एकटक पाहत राहणं तरुणाला भोवलं!

  133

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये १९ वर्षीय मुलाचा गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्षुल्लक गोष्टींवरुन ही हत्या झाली असल्याची पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तो बीडमधील माजलगावचा असल्याचे समजते. तो फ्लॅटमध्ये राहत होता. अज्ञात तरुणांनी त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये बीसीएसच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये घडलेल्या वादाची पार्श्ववभूमी असल्याचा पोलिसांनी तपासादरम्यान सांगितले आहे. प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यामुळेच त्याचा काटा काढल्याचे बोलले जाते आहे .



मंगळवारी रात्री ११.३० वाजता संक्रांतीच्या दिवशी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी फ्लॅटवर जात प्रदीपचा गळा चिरुन त्याला मारून टाकले. प्रदीप सोबत फ्लॅटवर त्याचा भाऊ आणि ३ मित्र राहत होते. सायंकाळी त्याचा भाऊ व अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप मृतावस्थेतच त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्यापही या खुनाचं कारण अस्पष्ट आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या