नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. भारतीय संघाने विश्वचषकमधील आजच्या सामन्याला पेरू संघाला अक्षऱश लोळवले. त्यांनी पेरूला दोन्ही टर्न मिळून ७०-३८ असे हरवले.
पहिल्या टर्नमध्ये भारताने पहिल्यांदा आक्रमण करताना ३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तराला पेरूच्या संघाने त्यानंतर १६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारताने आपले आक्रमण जबरदस्त ठेवले. भारतीय संघाने दुसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना निर्धारित वेळात ७० गुणांपर्यंत मजल मारली. त्यानंतर चौथ्या टर्नमध्ये पेरूच्या संघाला आक्रमणाला केवळ ३८ गुणांपर्यंत मजल मारता आली.
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने नेपाळला ४२-३७ असे हरवले होते. खरंतर नेपाळने पहिल्या सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने ब्राझीलला ६४-३४ असे हरवत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक लावली आहे. तिसऱ्या सामन्यात त्यांनी पेरूला हरवले. यासोबत भारतीय संघाने ३ सामन्यांतून ६ गुण मिळवले आहेत. भारत ग्रुप ए मध्ये खेळत आहे. यासोबतच भारताने ग्रुप एमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…