भारतीय महिलांनी उभारला धावांचा डोंगर

  56

राजकोट : आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला संघाने आयर्लंडच्या महिला संघाविरूद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय महिला संघाने ५० षटकांत पाच बाद ४३५ धावा केल्या. भारताच्या दोन्ही सलामीच्या बॅटरनी शतक साजरे केले तर यष्टीरक्षक फलंदाज रिचाने अर्धशतक केले.



प्रतिका रावलने १२९ चेंडूत एक षटकार आणि २० चौकार मारत १५४ धावा केल्या. कर्णधार असलेल्या स्मृती मंधानाने अवघ्या ८० चेंडूत सात षटकार आणि १२ चौकार मारत १३५ धावा काढल्या. प्रतिकाने ११९.३८ आणि स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने ४२ चेंडूत एक षटकार आणि १० चौकार मारत ५९ धावा केल्या. रिचाने १४०.४८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तेजल हसबनीसने २५ चेंडूत २८ धावा केल्या. हरलीन देओलने १० चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद ४ तर दीप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. भारताला २९ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाले.



धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या दोन प्रमुख बॅटर लवकर बाद झाल्या. कर्णधार असलेली गॅबी लुईस फक्त एक धाव करुन बाद झाली. यष्टीरक्षक फलंदाज कुल्टर रेली शून्य धावा करुन बाद झाली. आयर्लंडने १३ षटकांत दोन बाद ८१ धावा केल्या. सारा फोर्ब्स आणि ओरला प्रेंडरगास्ट या दोन बॅटर खेळत आहेत.
Comments
Add Comment

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील