भारतीय महिलांनी उभारला धावांचा डोंगर

राजकोट : आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला संघाने आयर्लंडच्या महिला संघाविरूद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय महिला संघाने ५० षटकांत पाच बाद ४३५ धावा केल्या. भारताच्या दोन्ही सलामीच्या बॅटरनी शतक साजरे केले तर यष्टीरक्षक फलंदाज रिचाने अर्धशतक केले.



प्रतिका रावलने १२९ चेंडूत एक षटकार आणि २० चौकार मारत १५४ धावा केल्या. कर्णधार असलेल्या स्मृती मंधानाने अवघ्या ८० चेंडूत सात षटकार आणि १२ चौकार मारत १३५ धावा काढल्या. प्रतिकाने ११९.३८ आणि स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने ४२ चेंडूत एक षटकार आणि १० चौकार मारत ५९ धावा केल्या. रिचाने १४०.४८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तेजल हसबनीसने २५ चेंडूत २८ धावा केल्या. हरलीन देओलने १० चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद ४ तर दीप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. भारताला २९ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाले.



धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या दोन प्रमुख बॅटर लवकर बाद झाल्या. कर्णधार असलेली गॅबी लुईस फक्त एक धाव करुन बाद झाली. यष्टीरक्षक फलंदाज कुल्टर रेली शून्य धावा करुन बाद झाली. आयर्लंडने १३ षटकांत दोन बाद ८१ धावा केल्या. सारा फोर्ब्स आणि ओरला प्रेंडरगास्ट या दोन बॅटर खेळत आहेत.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत