पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मुंबईत युद्धनौका, पाणबुडीचे होणार लोकार्पण

Share

स्नेहभोजनामध्ये महायुतीच्या आमदारांशी साधणार सुसंवाद

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर पंतप्रधान मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी हे १५ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील. या दौऱ्यादरम्यानच ते महायुतीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या महायुतीच्या विजयाच्या वादळात विरोधी बाकावरील महाविकास आघाडीची वाताहात झाली. त्यानंतर सरकारच्या शपथविधीत पंतप्रधानांनी हजेरी लावली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांना नियोजित कार्यक्रमामुळे महायुतीच्या आमदारांना भेटता आले नव्हते. आता, मात्र, भाजपासह महायुतीचे मंत्री, आमदारांना पंतप्रधान भेटणार आहेत.

येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, राज्यात सगळ्याच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे मिनी विधानसभेत घवघवीत यश मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. मुंबईसह, ठाणे, पुणे आणि इतर महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली जाऊ शकते. त्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा महत्त्वाचा समजला जात आहे. विधानसभेतील यशाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पडावे यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे.

Recent Posts

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

5 minutes ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

60 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago