Walmik Karad Update : लेकाला न्याय मिळावा यासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्री मैदानात उतरल्या

बीड : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. देशमुखांच्या हत्येप्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. या हत्येचा मास्टर माईंड वाल्मिक कराड हा १ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता. मात्र आता त्याला न्याय मिळावा यासाठी त्याच्या मातोश्रींनी आंदोलन केले आहे.


वाल्मिक कराडला याआधी १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशातच वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या आईसोबतच वाल्मिक कराडचे समर्थक सुद्धा आता आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी सुद्धा टॉवर चढून आंदोलनाला सुरवात केली आहे.



एकीकडे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी त्यांचा भाऊ धनंजय देशमुखने काल (दि. १३) पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आधीची एसआयटी टीम आरोपींच्या संपर्कात असल्याने ती बदलावी या त्यांच्या मागणीची आज पूर्तता होऊन १ जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय.


दरम्यान आता वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या