महाकुंभ २०२५: पहिल्या दिवशी तब्बल १.५ कोटी लोकांनी केले महास्नान

Share

लखनऊ: भक्तीचे महापर्व महाकुंभाची सुरूवात आजपासून प्रयागराजमध्ये झाली आहे. आज पौष पोर्णिमेला अमृतस्नान आहे. सकाळपासून भक्तगण गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमामध्ये डुबकी घेत आहे. आजा अपेक्षा होती की साधारण एक कोटीच्या जवळपास भक्तगण येथे स्थान कतील. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली की आज तब्बल दीड कोटी लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नानाचे पुण्य लाभ मिळवले आहे.

१.५ कोटी लोकांनी घेतले स्नानाचे पुण्य

मुख्यमंत्री योगीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, मानवतेचे मंगलपर्व महाकुंभ २०२५मध्ये पौष पोर्णिमेच्या शुभ पर्वाला या संगमावर स्नान करण्याचे भाग्य मिळवणारे सर्व, कल्पवासी, भक्तगण यांचे हार्दिक अभिनंदन.प्रथम स्नानाच्या पर्वावर आज १.५० कोटी लोकांनी या ठिकाणी स्नानाचा पुण्यलाभ घेतला.

आजपेक्षा मोठे असेल मकर संक्रांतीचे स्नान

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह म्हणाले, मकर संक्रांतीचे स्नान आजच्या स्नानापेक्षा मोठे असेल. दीड वर्षांपासून राज्य सरकार या कुंभ मेळ्यासाठी तयारी करत होते. प्रयागराज शहरात आणि ४ हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या क्षेत्रात ७ हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

कुंभमध्ये स्नान केल्याने मिळते पापांपासून मुक्ती

अशी मान्यता आहे की कुंभ मेळ्यामध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

22 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

22 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

24 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

36 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

41 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago