महाकुंभ २०२५: पहिल्या दिवशी तब्बल १.५ कोटी लोकांनी केले महास्नान

लखनऊ: भक्तीचे महापर्व महाकुंभाची सुरूवात आजपासून प्रयागराजमध्ये झाली आहे. आज पौष पोर्णिमेला अमृतस्नान आहे. सकाळपासून भक्तगण गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमामध्ये डुबकी घेत आहे. आजा अपेक्षा होती की साधारण एक कोटीच्या जवळपास भक्तगण येथे स्थान कतील. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली की आज तब्बल दीड कोटी लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नानाचे पुण्य लाभ मिळवले आहे.



१.५ कोटी लोकांनी घेतले स्नानाचे पुण्य


मुख्यमंत्री योगीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, मानवतेचे मंगलपर्व महाकुंभ २०२५मध्ये पौष पोर्णिमेच्या शुभ पर्वाला या संगमावर स्नान करण्याचे भाग्य मिळवणारे सर्व, कल्पवासी, भक्तगण यांचे हार्दिक अभिनंदन.प्रथम स्नानाच्या पर्वावर आज १.५० कोटी लोकांनी या ठिकाणी स्नानाचा पुण्यलाभ घेतला.



आजपेक्षा मोठे असेल मकर संक्रांतीचे स्नान


उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह म्हणाले, मकर संक्रांतीचे स्नान आजच्या स्नानापेक्षा मोठे असेल. दीड वर्षांपासून राज्य सरकार या कुंभ मेळ्यासाठी तयारी करत होते. प्रयागराज शहरात आणि ४ हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या क्षेत्रात ७ हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.



कुंभमध्ये स्नान केल्याने मिळते पापांपासून मुक्ती


अशी मान्यता आहे की कुंभ मेळ्यामध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Comments
Add Comment

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक