टीम इंडियाच्या या खेळाडूसोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर अभिषेक शर्मासोबत जे काही झाले, ते त्याने सोमवार (13 जानेवारी) रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याची माहिती दिली.

दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या स्टाफने अभिषेक शर्माशी गैरवर्तन केले. याबाबत त्याने इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला.अभिषेक शर्मानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, "दिल्ली विमानतळावर इंडिगोसोबत मला सर्वात वाईट अनुभव आला. कर्मचाऱ्यांचं, विशेषतः काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तलचं वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य होतं. मी वेळेवर योग्य काउंटरवर पोहोचलो, पण त्यांनी मला अनावश्यकपणे दुसऱ्या काउंटरवर पाठवलं. "अभिषेकनं पुढे लिहिलं, "नंतर मला सांगण्यात आलं की चेक-इन बंद आहे, ज्यामुळे माझी फ्लाइट चुकली. माझ्याकडे फक्त एक दिवस सुट्टी होती, जी आता पूर्णपणे वाया गेली आहे. परिस्थिती आणखी वाईट झाली, कारण ते कोणतीही मदत देत नाहीत. हा माझा सर्वात वाईट एअरलाइन अनुभव आहे." अभिषेक शर्माने दावा केला की त्याला अनावश्यकपणे काउंटरमध्ये पाठवण्यात आलं, ज्यामुळे त्याची फ्लाइट चुकली. त्यानं विमानळावरील एका कर्मचाऱ्याचंही नाव घेतलं आणि यावर कारवाईची मागणी केली आहे.

अभिषेक शर्माची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो संजू सॅमसनसोबत भारतीय डावाची सुरुवात करताना दिसणार आहे, अशी अपेक्षा आहे. अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावा केल्या आहेत. या दोन्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धही अभिषेक शर्मा हाच फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.