समृध्दी महामार्गालगत एग्रो हब उभारणार

मुंबई : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गालगत मॅग्नेट प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक अॅग्रो हब उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पणन विभागाला दिले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्यातच आवश्यक ते नियोजन करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठीच जास्त मागणी आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशी सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या पणन विभागाला दिली आहे.



मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या पणन विभागाच्या मागील १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पणन विभागाला दिले.कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे. यासाठी राज्याच्या चारही विभागात आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे अॅग्रो लॉजिस्टक हब उभारण्यात यावेत. या हबसाठी प्रस्ताव सादर करा; असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पणन विभागाला दिले आहेत.



पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महा बाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपावर्गिकरण करणार. छ. संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ऍग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही देवरा यांनी यावेळी सांगितले. बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे - बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.
Comments
Add Comment

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Garib Nagar Demolition Day 2 : मोठी बातमी! वांद्र्यातील गरीब नगरमध्ये तणाव; पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज, कारवाई मात्र सुरूच राहणार

मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व (Bandra East) परिसरातील 'गरीब नगर' (Garib Nagar) भागात सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातावरण पाहायला

विधान परिषदेच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; घबराट पसरवून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आणू नये मुंबई : "विधान परिषद

BMC News : धक्कादायक! मुंबईच्या नालेसफाईत सापडली चक्क अख्खी रिक्षा; बीएमसीच्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर

Mumbai’s Iconic Vada Pav : मुंबईकरांच्या 'इमोशन'ला महागाईची फोडणी! मुंबईत वडापाव आणि मिसळ पावाच्या दरात प्रति पॅकेट थेट १० रुपयांची वाढ

मुंबई : मुंबईकरांची 'लाईफलाईन' आणि रोजच्या धावपळीच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव, तसेच खवय्यांची आवडती