भारतातील दोन शहरात होते सर्वाधिक वाहतूक कोंडी

  68

नवी दिल्ली : ताज्या पाहणीनुसार भारतातील दोन शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. यात आघाडीवर आहे ती पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरू. कोलकाता आणि बंगळुरू या दोन शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.



कोलकातामध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे ३३ सेकंद लागतात तर बंगळुरूमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे १० सेकंद लागतात. डच लोकेशन टेक्नॉलॉजी टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३३ मिनिटे मिनिटे २२ सेकंद लागतात. यामुळे ट्रॅफिक इंडेक्समध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीत वाहतूक कोंडीच्या बाबतीत कोलकाता दुसऱ्या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या क्रमांकावर आहे.



टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार हैदराबादमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३२ मिनिटे लागतात. तर चेन्नईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान २९ मिनिटे लागतात.

जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, शहराच्या नियोजनातील ढिसाळपणा, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून देशातील प्रमुख शहरांतील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारणे, शहराचे योग्य प्रकारे नियोजन करणे, सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यासाठी चालना देणे असे वेगवेगळे उपाय करुन मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणे शक्य आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

निवडणूक आयोग राजकीय पक्षांना देणार मतदार याद्यांचा डेटा

नवी दिल्ली : निवडणूक आयोग राजकीय पक्षांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या शेअर करणार आहे. काँग्रेसने

हवाईदलात होणार ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात लवकरच ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारत देखील

'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या

खराब हवामानामुळे शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुढे ढकलले, आता ११ जूनला होणार Axiom-4 मिशनचे लाँचिंग

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे

PM Modi : मातृभाषांचा सन्मान, मोदींचा संकल्प! मोदींची ११ वर्षे, ११ भाषांचा सुवर्णकाळ

नेहरूंनी बाजूला सारलं, मोदींनी भाषांना तारलं मातृभाषांला नवजीवन: मोदींचा ऐतिहासिक निर्णय भाषा ही फक्त

Cargo Ship Catches Fire: न्हावा शेवाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहक जहाजाला भर समुद्रात महाकाय आग, क्रू मेंबर्स आगीत होरपळले

केरळ: सोमवारी सकाळी केरळच्या कोझिकोड किनाऱ्याजवळ WAN HAI 503 नावाच्या मालवाहू जहाजाला महाकाय आग (Cargo Ship Catches Fire) लागल्याची