भारतातील दोन शहरात होते सर्वाधिक वाहतूक कोंडी

नवी दिल्ली : ताज्या पाहणीनुसार भारतातील दोन शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. यात आघाडीवर आहे ती पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरू. कोलकाता आणि बंगळुरू या दोन शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.



कोलकातामध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे ३३ सेकंद लागतात तर बंगळुरूमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे १० सेकंद लागतात. डच लोकेशन टेक्नॉलॉजी टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३३ मिनिटे मिनिटे २२ सेकंद लागतात. यामुळे ट्रॅफिक इंडेक्समध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीत वाहतूक कोंडीच्या बाबतीत कोलकाता दुसऱ्या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या क्रमांकावर आहे.



टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार हैदराबादमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३२ मिनिटे लागतात. तर चेन्नईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान २९ मिनिटे लागतात.

जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, शहराच्या नियोजनातील ढिसाळपणा, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून देशातील प्रमुख शहरांतील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारणे, शहराचे योग्य प्रकारे नियोजन करणे, सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यासाठी चालना देणे असे वेगवेगळे उपाय करुन मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणे शक्य आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.