राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.



स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.



भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 
Comments
Add Comment

Amit Shah : घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची तयारी; लोकसंख्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत

नवी दिल्ली : देशात अवैध घुसखोरी आणि इतर अप्राकृतिक कारणांमुळे होत असलेल्या लोकसंख्येतील बदलांचा सखोल अभ्यास

India US critical minerals deal : भारत-अमेरिकेमध्ये खनिज करार

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेमध्ये मंगळवारी महत्त्वपूर्ण दुर्मीळ खनिजे व महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीबाबत

कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न)

Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Uttar Pradesh Road Accident : आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; पोलिस अधिकारी आणि कैद्यासह ६ जणांचा मृत्यू, ३२ प्रवासी जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर आज म्हणजेच मंगळवार २६ मे रोजी पहाटे भीषण अपघात