Jasprit Bumrah: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत आली ही बातमी

मुंबई: जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याचे संघाबाहेर असणे म्हणजे टीम इंडियासाठी मोठा धक्काच आहे. सिडनीत खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत बुमराहला पाठीचे दुखणे सुरू झाले. यानंतर तो स्कॅनसाठी गेला होता. यानंतरपासूनच बुमराहच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त हो होती. आता समोर आलेल्या रिपोर्ट्मध्ये सांगितलेय की बुमराह फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात खेळू शकत नाही.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या उपलब्धतेबाबत अद्यापही सवाल सुरू आहे. मात्र आता निवड समितीला उत्तर मिळाले आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फिट असू शतो. याचा सरळ अर्थ आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील सामन्याला तो मुकू शकतो.



बुमराहच्या पाठीला सूज आहे. त्यामुळे तो नॅशनल क्रिकेट अकादमीला रिकव्हरीसाठी जाण्याची शक्यता आहे. एनसीएमध्ये वेळ घालवल्यानंतर भारतीय गोलंदाजाकडे फिटनेसचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे तसेच एक अथवा दोन सराव सामने खेळावे लागतील.


सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह रिहॅबसाठी एनसीएला जाईल. सुरूवातीच्या रिपोर्टनुसार त्याला फ्रॅक्चर नाही आहे मात्र पाठीला सूज आहे. यासाठी एनसीए त्याच्या रिकव्हरीसाठी मॉनिटर करेल. तेथे तो दोन आठवडे राहील.



मोहम्मद शमीचे पुनरागमन


एकीकडे जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आली असता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे. शनिवारी बीसीसीआयकडून इंग्लंडच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कऱण्यात आली. यात शमीच्या नावाचाही समावेश आहे. शमी तब्बल १४ महिन्यांनी टीम इंडियामध्ये परतत आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे