Sesame Price Hike : मकरसंक्रातीच्या गोडव्यात महागाईचा कडवटपणा! तिळाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

गेवराई : इंग्रजी नववर्ष सुरु होताच येणारा पहिला सण म्हणजेच मकरसंक्रात. यंदाची मकरसंक्रात (Makarsankrat 2025) अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. हळदीकुंकवाचे वाण तसेच पतंग घेण्यासाठी ग्राहकांची बाजारात मोठी रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच मकरसंक्रातीत महत्त्वाचे असणाऱ्या तिळाच्या लाडूचा गोडवा कमी होणार आहे. मकरसंक्रातीत तिळाची मोठी मागणी पाहता अचानक तिळाच्या किमतीत वाढ (Sesame Price Hike) झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या तोंडावर दीडशे रुपये किलो मिळणाऱ्या तिळाच्या भावात अचानक ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता संक्रांतीत किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने विकला जात आहे.


दरम्यान, सातत्याने जीवनावश्यक वस्तू महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. त्यातच आता मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वाढल्याने सणाचा गोडवा कमी झाला आहे.

Comments
Add Comment

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

मंत्री छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये सोबत घेऊन येणार स्व.अजितदादा पवार यांचा अस्थिकलश

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या येवला आणि नाशिकमध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन शोकसभेवेळी

Pune Police Bharti : पुणेकरांसाठी मोठी बातमी! अखेर पोलीस भरतीचे बिगुल वाजले; 'या' तारखेपासून चाचणीला सुरुवात

पुणे : पुणे शहराच्या सीमांचा विस्तार आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता, पुणे पोलीस दलावर पडणारा ताण कमी

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी