Sesame Price Hike : मकरसंक्रातीच्या गोडव्यात महागाईचा कडवटपणा! तिळाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

गेवराई : इंग्रजी नववर्ष सुरु होताच येणारा पहिला सण म्हणजेच मकरसंक्रात. यंदाची मकरसंक्रात (Makarsankrat 2025) अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. हळदीकुंकवाचे वाण तसेच पतंग घेण्यासाठी ग्राहकांची बाजारात मोठी रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच मकरसंक्रातीत महत्त्वाचे असणाऱ्या तिळाच्या लाडूचा गोडवा कमी होणार आहे. मकरसंक्रातीत तिळाची मोठी मागणी पाहता अचानक तिळाच्या किमतीत वाढ (Sesame Price Hike) झाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या तोंडावर दीडशे रुपये किलो मिळणाऱ्या तिळाच्या भावात अचानक ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यापूर्वी १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा तीळ आता संक्रांतीत किरकोळ बाजारात २०० रुपये किलोने विकला जात आहे.


दरम्यान, सातत्याने जीवनावश्यक वस्तू महागल्याने गृहिणी त्रस्त आहेत. त्यातच आता मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वाढल्याने सणाचा गोडवा कमी झाला आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार