दिसपूर : देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणात वाढ होत आहे. असाच काहीसा प्रकार आसाममध्येही घडताना दिसत आहे. लखीमपूरमध्ये, एका १० महिन्यांच्या ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ मार्गिका १८.६ किमी लांबीची असून यात १७ स्थानकांचा समावेश आहे. तर ‘मेट्रो ७’ मार्गिका १६.५ किमी लांबीची असून यावर एकूण १३ स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल आणि या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. या दोन्ही मार्गिकांना मुंबईकरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या या दोन्ही मार्गिकांवरुन अडीच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. आता या मार्गिकांवरुन १५ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे. वेगवान, सुकर, सुरक्षित प्रवासामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळते. आता या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आणखी वेगाने धावणार आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन महिने पण झाले नाही तोच महाविकास आघाडीचा फुगा फुटला आहे. उद्धव ठाकरे गटाच्यावतीने संजय राऊत यांनीच ...
अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ' आणि 'दहिसर – गुंदवली मेट्रो ७' या मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांना मेट्रो संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले होते. यामुळे दोन्ही मार्गिकांवर मेट्रो गाड्या ताशी ५० ते ६० किमी वेगाने धावत होत्या. आता या मार्गिकांच्या नियमित संचलनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे दोन्ही मार्गिकांवर मेट्रो गाड्या ताशी ८० किमी वेगाने धावू शकतील.
मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच विक्रोळीत बेस्ट बसने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट बस चालक ...
मुंबईकरांना वेगवान, सुरक्षित, सुकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. 'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७' ला नियमित संचलनासाठी सीसीआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे महायुती सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून आणखी एक वचन पूर्ण केले आहे. आता मेट्रोचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.