Heart Attack : अस्वस्थ वाटल्यामुळे बेंचवर बसली अन् क्षणार्धात कोसळली; व्हायरल व्हिडिओ!

अहमदाबाद : सध्या लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे समोर आले आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे एका ८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदय विकाराच्या झटक्याने (Heart Attack) शाळेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)



मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. तिसरीच्या वर्गात शिकणारी गार्गी रणपारा (८) असे मृत मुलीचे नाव असून आज सकाळी शाळेच्या वर्गात जात असताना लॉबीमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बेशुद्ध पडली. यावेळी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शालेय शिक्षकांनी तिला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) दिले आणि रुग्णवाहिका बोलावून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गार्गीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये आठ वर्षांची मुलगी शाळेच्या लॉबीमध्ये चालताना दिसत आहे. तथापि, तिच्या वर्गात जाताना तिला अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे ती लॉबीमध्ये खुर्चीवर बसते. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर खुर्चीवरून सरकताना दिसत आहे. ती कोसळली तेव्हा शिक्षक आणि इतर विद्यार्थी लॉबीमध्ये उपस्थित होते. (Heart Attack)


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात