मुंबई : कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघाताची बातमी ताजी असतानाच विक्रोळीत बेस्ट बसने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेस्ट बस चालक गाडी चालू ठेवून लघुशंकेला गेल्यानंतर गाडी अनियंत्रित होऊन दोन पादचाऱ्यांना जागीच ठार केले.
विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात शनिवारी सकाळी बेस्ट बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात झाला. गाडी चालू ठेवून बस चालक लघुशंकेला गेला असता गाडीचे नियंत्रण सुटून गाडीने चहाच्या टपरीला धडक देऊन नंतर पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी असलेले दोन्ही इसम हे वेठबिगारीची काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…