मृत व्यक्तिचे सोशल मिडीया खाते बंद होणार

भारताने केली नियमावलीत तरतूद


नवी दिल्ली: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सोशल मीडिया अकाऊंटचे बंद करावे लागणार आहे. देशात लवकरच याबद्दल आता नियमावली बनवली जाणार आहे. भारतात “डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट रूल- २०२५” मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे.


या कायद्यातील तरतुदींनुसार व्यक्तीचा खासगी डेटा कसा प्रोसेस केला जावा आणि तो कसा स्टोअर केला जावा याबद्दलचे नियम करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गोपनीयता आणि खासगीपणाचा अधिकार अबाधित राहावा, असा या कायद्याचा उद्देश आहे. तसेच जी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था व्यक्तीचा डेटा प्रोसेस करते, त्याबद्दलाचे निर्णय घेत आणि हा डेटा स्टोअर करते त्यासाठी डेटा फिडुसिअरी अशी संज्ञा वापरण्यात आलेली आहे. तसेच हा नवा कायदा असे सांगतो की, डेटा फिडुसिअरींनी जर काही कायदेशीर बाबींच्या पूर्ततेबद्दलची गरज नसेल तर असा पर्सनल डेटा नष्ट केला पाहिजे. याचाच अर्थ असा की सोशल मीडिया कंपनी, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी जे अकाऊंट सक्रिय नाहीत ते पुढाकार घेऊन बंद करायचे आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींचा नजिकच्या काळात मृत्यू झाला आहे, त्यांचे अकाऊंट बंद करावे लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटले आहे की कंपन्यांना या नियमांची पूर्तता करण्यासाठी २ वर्षांचा कालावधी मिळेल, यासंदर्भात चर्चा सुरू आहेत.


सोशल मीडिया कंपन्यांचे मृत व्यक्तींच्या अकाऊंटबद्दल वेगवेगळे नियम आहेत. नातेवाईकांनी जर विनंती केली तर मृत व्यक्तीचे अकाऊंट फेसबुक तसेच सुरू ठेवते. यासाठी फेसबुकला संबंधित नातेवाईकांनी अर्ज करावा लागतो. तर ट्विटरवर (एक्स) जी खाती सक्रिय नाहीत ती हटवली जातात. ट्विटरवर २०१६ मध्ये ६ महिन्यांपेक्षा दीर्घकाळ सक्रिय नसणारी खाती हटवण्यास सुरुवात झाली होती, यावरून मोठा वादही झाला होता. एलन मस्क यांनी ट्विटरवर ताबा घेतल्यानंतर त्याचे नाव एक्स असे केले आणि मे २०२३ पासून सक्रिय नसलेली खाती हटवायला सुरुवात केली.

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या

आयडब्ल्यूडीसी ३.०' अंतर्देशीय जलमार्ग विकासाला नवी दिशा देणार

कोची : अंतर्देशीय जल वाहतूक (आयडब्ल्युटी) क्षेत्रातील यशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि भविष्यातील दृष्टिकोन

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट

जम्मू काश्मीर : डोडा जिल्ह्यात लष्करी वाहनाला अपघात, १० जवानांचा मृत्यू

डोडा : जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्करी वाहन जरीत कोसळले. या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झाला. तसेच अकरा

Vaishno Devi Dham : आता रात्रीही घेता येणार माता वैष्णोदेवीच्या प्राचीन गुहेचे दर्शन, वाचा नवीन वेळापत्रक

कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय

चकमकीत ठार झाला एक कोटींचे बक्षीस लावलेला नक्षलवादी अनल दा, इतर १४ नक्षलवादीही ठार

रांची : गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून झारखंड पोलिसांनी सारंडाच्या घनदाट जंगलात अनेक