भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान

जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका


नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले.


रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही अभूतपूर्व मानवीय संकट निर्माण झाले आहे. भारत या आव्हानाकडे कसे पाहतो..? देश जगाच्या मित्राच्या भूमिकेत आहे की तटस्थ आहे, या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत शांततेच्या बाजूने आहे.



जागतिक शक्तींमधील प्राणघातक, हिंसक संघर्षादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले की, आज जगात भारताबद्दल विश्वास आहे. आमचे वागणे दुटप्पी नसून आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे वागत नाही. या संकटकाळात आम्ही सातत्याने सांगितले आहे की, आम्ही तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहोत. माझा दृष्टिकोन शांतीचा आहे आणि त्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील त्यांना मी पाठिंबा देईन असे मोदींनी सांगितले. रशिया-युक्रेन, इस्रायल, इराण आणि पॅलेस्टाईनलाही माझे हेच सांगणे असते की, शांततेतून प्रश्न सुटतो त्यामुळे शांतील पर्याय नाही. विशेष म्हणजे भारतीयांना जसा माझ्यावर विश्वास आहे की, हे देशाचे संकट योग्य पद्धतीने हाताळतील तसाच विश्वास या देशांना देखील आहे की, भारत जे बोलतो तीच त्यांची खरी आणि योग्य भूमिका आहे असे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह

अयोध्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी - दत्तात्रेय होसबळे

नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांमधून झालेल्या चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे.

जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या

History of Death Penalty : भारतात फाशी देण्यात आलेली एकमेव महिला कोण? सिया गोयल प्रकरणानंतर पुन्हा इतिहास चर्चेत

नवी दिल्ली : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Murder Case) मुख्य आरोपी सिया गोयलला फाशीची