दिल्ली विमानतळावर आढळली मगरीची कवटी

कॅनडाहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात


नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये मगरीची कवटी आढळून आली आहे. हा प्रवासी कॅनडाहून आला असून विमानतळावर बॅगची तपासणी करताना ही कवटी आढळून आली. संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर केले नसले तरी त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडाहून भारतात आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाची बॅग तपासताना काहीतरी अणकुचीदार लागले. त्यामुळे त्याच्या बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या बॅगमधून मगरीच्या पिल्लाची कवटी सापडली. त्‍याच्याकडे असलेल्‍या बॅगेत एका क्रिमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. ही कवटी सुमारे ७७७ ग्रॅम वजनाची आहे अशी माहिती कस्‍टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भातील निवेदनात कस्टम अधिकारी म्हणाले की, भारतात संरक्षित असणाऱ्या मगरीची ही कवटी आहे.


भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्‍याचा व कस्‍टम कायद्याचा भंग केल्‍याचा ठपका संबधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्‍या प्राण्याच्या अवयवांची तस्‍करी करणे हा गुन्हा गंभीर स्‍वरुपाचा असून आता याबाबात कस्‍टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्‍तरितीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्‍तांतरीत करण्यात आली असून. याची आता तपासणी केली जाणार आहे. भारतामध्ये २०११ ते २०२० या कालावधीत विमानतळावरुन वन्यजीवांच्या अवयवांची तस्‍करीच्या १४१ घटना उघडकीस आल्‍या आहेत. यामध्ये जवळपास १४६ प्रकारच्या वन्यजीवांची तस्‍करी करण्याचा प्रयत्‍न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यामध्ये समावेश आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव