दिल्ली विमानतळावर आढळली मगरीची कवटी

कॅनडाहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात


नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये मगरीची कवटी आढळून आली आहे. हा प्रवासी कॅनडाहून आला असून विमानतळावर बॅगची तपासणी करताना ही कवटी आढळून आली. संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर केले नसले तरी त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडाहून भारतात आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाची बॅग तपासताना काहीतरी अणकुचीदार लागले. त्यामुळे त्याच्या बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या बॅगमधून मगरीच्या पिल्लाची कवटी सापडली. त्‍याच्याकडे असलेल्‍या बॅगेत एका क्रिमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. ही कवटी सुमारे ७७७ ग्रॅम वजनाची आहे अशी माहिती कस्‍टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भातील निवेदनात कस्टम अधिकारी म्हणाले की, भारतात संरक्षित असणाऱ्या मगरीची ही कवटी आहे.


भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्‍याचा व कस्‍टम कायद्याचा भंग केल्‍याचा ठपका संबधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्‍या प्राण्याच्या अवयवांची तस्‍करी करणे हा गुन्हा गंभीर स्‍वरुपाचा असून आता याबाबात कस्‍टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्‍तरितीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्‍तांतरीत करण्यात आली असून. याची आता तपासणी केली जाणार आहे. भारतामध्ये २०११ ते २०२० या कालावधीत विमानतळावरुन वन्यजीवांच्या अवयवांची तस्‍करीच्या १४१ घटना उघडकीस आल्‍या आहेत. यामध्ये जवळपास १४६ प्रकारच्या वन्यजीवांची तस्‍करी करण्याचा प्रयत्‍न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यामध्ये समावेश आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही