Ratnagiri Sea : रत्नागिरीच्या समुद्रात घडली थरारक घटना!

रत्नागिरी : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर 'वॉच' राहावा, यासाठी काल ( दि. ९ ) ड्रोन प्रणालीचे उद्घाटन केले. अशातच रत्नागिरी समुद्रात बुधवारी ( दि. ८ ) रोजी रात्री उशिरा एका गस्तीनौकेवरील अधिकाऱ्यांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे.


रात्री अकराच्या सुमारास समुद्रात अवैध बोटी असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्तीनौका गोळप-पावस या दिशेने गेली होती. यावेळी हा प्रकार घडला. अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी घेरले व हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली.



यावेळी बोटीतील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. या सगळ्या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेत त्यांनी स्थानिक मच्छीमार व पोलीस कुमक पाठवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


हा सगळा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी जवळ समुद्रात घडला आहे. संबंधित परप्रांतीय नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढची कार्यवाही सुरू आहे.

Comments
Add Comment

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून पुन्हा एकदा

'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.