प्रहार    

Ratnagiri Sea : रत्नागिरीच्या समुद्रात घडली थरारक घटना!

  116

Ratnagiri Sea : रत्नागिरीच्या समुद्रात घडली थरारक घटना!

रत्नागिरी : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर 'वॉच' राहावा, यासाठी काल ( दि. ९ ) ड्रोन प्रणालीचे उद्घाटन केले. अशातच रत्नागिरी समुद्रात बुधवारी ( दि. ८ ) रोजी रात्री उशिरा एका गस्तीनौकेवरील अधिकाऱ्यांवर परप्रांतीयांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे.


रात्री अकराच्या सुमारास समुद्रात अवैध बोटी असल्याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्तीनौका गोळप-पावस या दिशेने गेली होती. यावेळी हा प्रकार घडला. अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींना पकडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर बोटिंवरील खलाशांनी घेरले व हल्ला करण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली.



यावेळी बोटीतील अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सहाय्यक आयुक्तांना संपर्क केला व सूत्र हलली. या सगळ्या गंभीर घटनेची तात्काळ दाखल घेत त्यांनी स्थानिक मच्छीमार व पोलीस कुमक पाठवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.


हा सगळा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री उशिरा रत्नागिरी जवळ समुद्रात घडला आहे. संबंधित परप्रांतीय नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढची कार्यवाही सुरू आहे.

Comments
Add Comment

मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना द्या हा पौष्टिक आहार

मुंबई: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या उंचीसाठी

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

लाँग वीकेंडमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणे टाळा!

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यात एक मोठा लाँग वीकेंड येत आहे.