Bhiwandi Wada Road : भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम कासव गतीने सुरू!

  125

रस्ता खोदून ठेवल्याने चालक, प्रवासी हैराण


वाडा : बहुचर्चित व वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. मात्र सदरचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरू असून सदरचे काम हे ईगल कंपनीस दिल्याचे समजते या कंपनीकडून हा मार्ग गेल्या दिड महिन्यापासून खाेदलेल्या अवस्थेत आहे. या महामार्गाच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता राखुन काम जलदगतीने होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रमेश भोईर यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.



वाडा-भिवंडी महामार्गावर गांधरे, शिरीषपाडा, कुडूस, वडवली, नारे, घोणसई फाटा, मुसारणे फाटा, डाकिवली, अंबाडी, दुगाड फाटा या ठिकाणी एका बाजुचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील माती, धुळीमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. सुरू असलेले खोदकाम निविदेनुसार होत आहे किंवा नाही? तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता याकडे कानाडाेळा करत असल्यामुळे शासनाचे करोंडो रुपये पुन्हा वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे प्रवाशांकडून बाेलले जात आहे.

Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,