नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक


गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर पालघर शहरावर शिवसेनेचे असलेले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. वाडा आणि जव्हार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने इतिहास नोंदविला. डहाणूमध्ये भारतीय जनता पक्षाने २७ पैकी १७ जागा जिंकल्या, मात्र नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागल्याने येथील निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत आहे. अशा अनेक बाबी या निकालानंतर समोर आल्या आणि आणखी काही विषय समोर येणे आवश्यक आहेत.


या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीची. शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (शरद पवार ) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीत असलेल्या राजकीय पक्षाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा भाजपबाबत द्वेष नाही, मात्र भाजपने नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवार नको आहे. अशी आगळीवेगळी भूमिका या निवडणुकीत घेतली. त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा साथ दिली. दोन्ही शिवसेनेमध्ये विस्तव जात नसताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) मधील नेते शिंदेंच्या शिवसेनेसोबत कोणत्याही विषयावर एकमत करायला तयार नसताना डहाणू येथे मात्र भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या राजू माच्छी यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोट बांधली. "भाजप चालेल पण भरत नको" असाच प्रचार सुद्धा या निवडणुकीत मतदारांसमोर करण्यात आला. या निवडणुकीच्या निकालात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत यांचा ४ हजार ५५ मतांनी पराभव झाला. त्यांना एकूण १० हजार ७६० मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे राजू माच्छी यांना एकूण १४,८१५ मते मिळाली. या ठिकाणी २७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे निवडून आले.


भाजपच्या निवडून आलेल्या १७ उमेदवारांच्या मतदानाची बेरीज केली असता, १७ हजार ९९७ एवढी आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजप नगरसेवकांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत भरत राजपूत यांना ७ हजार ३७ मते कमी मिळाली आहेत. यावरून "क्रॉस वोटिंग" झाले हे स्पष्ट होत आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये मोठी मजल मारत नगराध्यक्षसह ११ नगरसेवक निवडून आले आहेत. जव्हार नगर परिषदेमध्ये दोन अंकी आकडा कधीही न गाठणाऱ्या भाजपने यावेळी २० पैकी १४ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद आपल्या पारड्यात पाडून घेतले आहे. पालघर नगर परिषदेमध्ये सुद्धा जागांचे "प्रमोशन" झाले आहे. यावेळी ८ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या निकालामुळे साहजिकच खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, निवडणूक प्रमुख बाबजी काठोके यांच्यासह जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनाच या यशाचे श्रेय जाते. रजपूत हे डहाणूमध्ये पराभूत झाल्यामुळे या एकाच विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मात्र डहाणूतील १७ नगरसेवकांचे यश, यासह जिल्ह्यातील ९४ पैकी तब्बल ५० नगरसेवक निवडून आणणारे जिल्हाध्यक्ष म्हणून नक्कीच त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. परिणामी माजी नगराध्यक्ष डहाणूची निवडणूक हरले असले तरी जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतीची निवडणूक जिल्हाध्यक्ष म्हणून राजपूत हे जिंकलेच आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक