श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात

परराज्यांतील रोपांमुळे मूळ प्रत घसरण्याची भीती


सुपारी बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता


अलिबाग : कोकणातील सुपारीच्या बागा निसर्गाच्या चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना या बागा नव्याने उभ्या करण्यासाठी शासनातर्फे विविध राज्यांतील सुपारीची रोपे आणून पुरविली गेली; परंतू ही रोपे श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध रोठा सुपारीच्या (Rotha Betel nut) मुळावर उठली आहेत. या रोपांमुळे रोठा सुपारीची मूळ प्रत घसरण्याची भीती स्थानिक बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील सुपारी बागायतदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


रायगड जिल्ह्यात साधारणत: पाच हजार हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणतः ३५ ते ४० कोटींची उलाढाल होते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीची मोठी लागवड केली जाते. भौगोलिकदृष्ट्या या परिसरात सुपारीसाठी अत्यंत पोषक वातावरण उपलब्ध आहे. त्यामुळे सुपारी लागवडीकडे बागायतदारांचा विशेष कल असतो.



रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर चार वर्षांपूर्वी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सुपारीचे पीक धोक्यात आणले आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग येथील ९० टक्के सुपारीच्या बागा वादळाच्या तडाख्याने भुईसपाट झाल्या. सुपारीची लाखो झाडे वादळात उन्मळून पडली. वादळाच्या या धक्क्यातून किमान १० वर्षे बागायतदार सावरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. कारण, सुपारीचे एक झाड उत्पादनक्षम होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागतो. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता शासनाने येथील बागायतदारांना १०० टक्के अनुदानावर सुपारीची रोपे पुरविली होती. ही रोपे परराज्यातून आणण्यात आली होती. ही रोपे भविष्यात श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध रोठा सुपारीसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी बागायतदारांना भीती वाटत आहे. कारण, सुपारी हे क्रॉस पालिनेटेड (परपरागण) पीक आहे. परागीभवन प्रक्रिया होताना स्थानिक रोठा सुपारी आणि परराज्यातील सुपारी यांचा संकर होऊन मूळ रोठा सुपारीला याचा धोका होऊन मूळ प्रत खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.



रोठा सुपारीला विदेशातही मागणी


रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवदार असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांत निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने या सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही वाजवी असते. त्यामुळे फळपीक म्हणून सुपारी लागवड केली जाते.

Comments
Add Comment

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने