महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान शिल्लक असताना, गुरुवारी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना दोन्ही संघासाठी करो या मरोचा मुकाबला ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आधीच अंतिम चार संघांसाठी पात्र ठरले आहेत. आता, भारत आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानासाठी आमनेसामने येतील. दोन्ही संघांचे गुण समान आहेत. पण नेट रन रेटवर भारत न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे आणि पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग तीन पराभवांमधून धडा घेईल. जर भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनेल. पण जर ते हरले तर त्यांना पुढील सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला हरवावे यासाठी प्रार्थना करावी लागेल आणि बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवणे देखील आवश्यक असणार आहे.

भारताच्या अलीकडील पराभवांमुळे त्यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील कमकुवतपणा उघड झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. तर इंदूरमधील इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या मानसिक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण संघाला ५४ चेंडूत ५६ धावांची आवश्यकता होती. पण ते लक्ष्य गाठण्यात संघ अपयशी ठरला होता.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर स्मृती मानधना पुन्हा एकदा स्थिर सुरुवात आणि मोठी भागीदारी करुन करण्याची जबाबदारी असणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज हरलीन देओलकडूनही मोठी खेळी करण्याची अपेक्षा असेल. गोलंदाजी विभागात, गेल्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी संघात परतलेली रेणुका ठाकूरकडून लवकर विकेट्स घेण्याची अपेक्षा असेल.

डीवाय पाटीलची खेळपट्टी पारंपारिकपणे फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. पण दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे, या सामन्यात नाणेफेक देखील महत्त्वाची असेल. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आणि अनुभवी सुझी बेट्स भारतासाठी एक महत्त्वाचे आव्हान उभे करू शकतात. किवी संघाचे आधीच दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे ते पूर्ण षटकांच्या स्वरूपात खेळून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यास प्रयत्नशील असतील.

Comments
Add Comment

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप; 2030 स्पर्धेची धुरा आता भारताकडे

Commonwealth Games 2026  : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला.

Commonwealth Games 2026 : ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताचा अपूर्ण नकाशा; लव्हलिना बोरगोहेन यांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या यशस्वी कामगिरीनिमित्त ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आयोजित

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; 39 पदकांसह चौथे स्थान, बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण

ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत पदकतालिकेत चौथे स्थान

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धूमधडाका, ९१ चेंडूत केल्या एवढ्या धावा की प्रतिस्पर्धी धास्तावले

नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.