Hair Care : थंडीत 'या' चुकींमुळे गळतात केस

  51

मुंबई: थंडीच्या दिवसांत केस गळण्याची समस्या सामान्य आहे. थंडीच्या दिवसांत आपल्या केसांना अधिक पोषणाची गरज असते. थंडीत हवा अधिक रुक्ष असते. यामुळे स्काल्प ड्राय होतो. यामुळे केस कमकुवत होऊ तुटू लागतात.


तसेच थंडीत केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरचा वापर केल्याने केस कमकुवत होतात तसेच पटापट तुटतात. थंडीत केस नियमितपणे धुतले जात नाहीत यामुळे स्काल्पवर घाण जमा होते. यामुळे कोंड्याची समस्या अधिक वाढते. तसेच केस गळण्याचा धोकाही वाढतो.


केस जर व्यवस्थित धुतले नाही अथवा त्यांना व्यवस्थित कंडिशनिंग केले नाही तर केस खराब होऊ शकतात. खूप गरम पाण्याने केस धुतले तर खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी पाण्याचे तापमान योग्य राखणे गरजेचे असते.


तसेच ओले केस व्यवस्थित सुकवले पाहिजे. केस ओले राहिल्यानंतर त्यात वास येतो आणि केस गळती रोखली जाते. तसेच अधिक तणाव घेतल्यानेही केस गळू शकतात. यामुळे अधिक तणाव घेऊ नका.


आठवड्यात सतत केस धुतल्यानेही हेअरफॉलची समस्या वाढू शकते.


Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी