Share

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येच्या अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतानुसार परमेश्वर हा कृपाही करत नाही व कोपही करत नाही. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा नवस केल्याने, यज्ञयाग केल्याने किंवा अनेक प्रकारची कर्मकांडे केल्याने देव प्रसन्न होतो हा केवळ एक भ्रम आहे. प्रत्यक्षात परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग आहेत ते वेगळेच आहेत. परमेश्वराची कृपा संपादन करायचे असेल, त्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही हे जितके खरे आहे तितकेच हे ही खरे आहे की परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. तुम्ही म्हणाल हे असे कसे? एकदा म्हणता परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही आणि नंतर म्हणता परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. हे असे कसे ते मी आता सांगतो.

गंमत अशी आहे की, परमेश्वराचा संबंध निसर्ग नियमांशी आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे. ही गोष्ट जर नीट लक्षात घेतली नाही तर धर्म ही संकल्पना चुकते. धर्माच्या नावाखाली आज जो गोंधळ चाललेला आहे, त्याचे कारण निसर्गनियमच कुणी लक्षात घेतले नाहीत. निसर्गाचे नियम मानवी जीवनात निर्णायक आहेत. आपण जर धर्माचा इतिहास पाहिला, मानवजातीचा इतिहास पाहिला, संस्कृती पाहिली तर निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत हा सिद्धांतच इतर कोणी मांडला नाही. तो जीवनविद्येनेच प्रथम मांडला.

परमेश्वराची कृपा किंवा कोप होणार ते निसर्गनियमांना अनुसरूनच. परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो, परमेश्वर करत नाही. होणे व करणे हे दोन्ही शब्द नीट लक्षात घेणे हेच महत्त्वाचे. होणे वेगळे व करणे वेगळे. परमेश्वराची कृपा होणे व कृपा करणे या दोन्ही शब्दांत फरक आहे. निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट लक्षात आली तर सर्व कर्मकांडे गळून पडतात. निसर्गाच्या नियमांचे महत्त्व कळले तर आता प्रचलित असलेल्या धर्मांच्या संकल्पना किती बोथट व चुकीच्या आहेत हे कळेल. तुमच्या जीवनात जी सुख किंवा दुःख निर्माण होतात त्यात माणसाकडून घडणारे कर्म व निसर्गाचे नियम दोन्ही महत्त्वाचे आहेत, कारण हे दोन्ही एकत्र येऊनच नियती नावाची गोष्ट निर्माण होते. कर्म आणि निसर्गाचे नियम हे दोन्ही एकत्र येतातच म्हणजे माणसाने कर्म केले की, निसर्गाचे नियम सक्रिय होतात. निसर्गाच्या नियमांना सक्रिय करण्याचे काम आपण कर्माच्या द्वारे करतो.

Tags: nature

Recent Posts

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

28 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

9 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

10 hours ago