निर्णायक निसर्गनियम

  53

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


जीवनविद्येच्या अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतानुसार परमेश्वर हा कृपाही करत नाही व कोपही करत नाही. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा नवस केल्याने, यज्ञयाग केल्याने किंवा अनेक प्रकारची कर्मकांडे केल्याने देव प्रसन्न होतो हा केवळ एक भ्रम आहे. प्रत्यक्षात परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग आहेत ते वेगळेच आहेत. परमेश्वराची कृपा संपादन करायचे असेल, त्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही हे जितके खरे आहे तितकेच हे ही खरे आहे की परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. तुम्ही म्हणाल हे असे कसे? एकदा म्हणता परमेश्वर कृपा किंवा कोप करत नाही आणि नंतर म्हणता परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो. हे असे कसे ते मी आता सांगतो.



गंमत अशी आहे की, परमेश्वराचा संबंध निसर्ग नियमांशी आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे. ही गोष्ट जर नीट लक्षात घेतली नाही तर धर्म ही संकल्पना चुकते. धर्माच्या नावाखाली आज जो गोंधळ चाललेला आहे, त्याचे कारण निसर्गनियमच कुणी लक्षात घेतले नाहीत. निसर्गाचे नियम मानवी जीवनात निर्णायक आहेत. आपण जर धर्माचा इतिहास पाहिला, मानवजातीचा इतिहास पाहिला, संस्कृती पाहिली तर निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत हा सिद्धांतच इतर कोणी मांडला नाही. तो जीवनविद्येनेच प्रथम मांडला.


परमेश्वराची कृपा किंवा कोप होणार ते निसर्गनियमांना अनुसरूनच. परमेश्वराकडून कृपा किंवा कोप होतो, परमेश्वर करत नाही. होणे व करणे हे दोन्ही शब्द नीट लक्षात घेणे हेच महत्त्वाचे. होणे वेगळे व करणे वेगळे. परमेश्वराची कृपा होणे व कृपा करणे या दोन्ही शब्दांत फरक आहे. निसर्गाचे नियम मानवी जीवनात महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट लक्षात आली तर सर्व कर्मकांडे गळून पडतात. निसर्गाच्या नियमांचे महत्त्व कळले तर आता प्रचलित असलेल्या धर्मांच्या संकल्पना किती बोथट व चुकीच्या आहेत हे कळेल. तुमच्या जीवनात जी सुख किंवा दुःख निर्माण होतात त्यात माणसाकडून घडणारे कर्म व निसर्गाचे नियम दोन्ही महत्त्वाचे आहेत, कारण हे दोन्ही एकत्र येऊनच नियती नावाची गोष्ट निर्माण होते. कर्म आणि निसर्गाचे नियम हे दोन्ही एकत्र येतातच म्हणजे माणसाने कर्म केले की, निसर्गाचे नियम सक्रिय होतात. निसर्गाच्या नियमांना सक्रिय करण्याचे काम आपण कर्माच्या द्वारे करतो.

Comments
Add Comment

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

३ ऑगस्टला ब्रह्म मुहूर्तावर सूर्य आश्लेषा नक्षत्रात करणार प्रवेश, 'या' ५ राशींसाठी येणार आनंदाचे दिवस!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्रांमधील बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. लवकरच सूर्य

खरी मैत्री काय असते ?

मैत्रीचे नाते या जगात सर्वात सुंदर मानले जाते, कारण या नात्यात रंग दिसत नाही, सौंदर्य नाही, पैसा नाही आणि भेदभाव

Vastu Tips: या दिशेला चुकूनही ठेवू नका पैसे, नाहीतर येऊ शकते आर्थिक संकट

मुंबई: वास्तूशास्त्रानुसार, घरात पैसे कोणत्या दिशेला ठेवले जातात, याला खूप महत्त्व आहे. जर पैसे चुकीच्या दिशेला

१ ऑगस्टला सूर्य-बुध युतीमुळे 'बुधादित्य योग'; 'या' राशींचे नशीब फळफळणार!

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल आणि त्यांच्या युतीचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. १

Vastu Tips: 'या' वस्तू कधीही मोफत घेऊ नका, अन्यथा होईल मोठे आर्थिक नुकसान!

मुंबई: आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा आपण काही वस्तू दुसऱ्यांकडून मोफत घेतो किंवा भेट म्हणून स्वीकारतो. पण