Dombivli Girl Abused Case : पित्याच्या कुशीतही 'ती' असुरक्षितच!

  96

जन्मदात्यानेच केला मुलीवर विनयभंग


डोंबिवली : कल्याण मधील चिमुकलीची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका वडिलांनी स्वतःच्याच मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे महिलांवरील वाढते अत्याचार आणि नेहमीच कानावर येणाऱ्या घटनांनी नक्की स्री कुठे सुरक्षित राहू शकते याबाबतीत शंका निर्माण होत आहे. ज्या वडिलांमुळे घराला आधार मिळतो त्याच वडील मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीत घडली आहे.



रविवारी ( दि ५ ) जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेत मुलगी घरात एकटी होती. यावेळी वडिलांनी पीडित मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने विरोध केला असता नराधम बापाने शाळेची पुस्तके, कपडे जाळून टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. घडलेला हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. गेल्या सात दिवसाच्या कालावधीत दोन वेळा वडिलांनी माझ्यासोबत गैरप्रकार केला असल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. मानपाडा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने पती विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली