Nitin Gadkari : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार केंद्र सरकारकडून 'ही' ट्रीटमेंट’!

परिवहन मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा!


नवी दिल्ली  : केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रातील महिला, दिव्यांग व्यक्ती, बालकल्याणसह तरुण पिढीसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तर आता रस्ते अपघातातील पीडितांसाठीही केंद्र सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. याद्वारे रस्ते अपघातात (Road Accident) जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.



केंद्र सरकारने रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ (Cashless Treatment Yojana) योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरिता दीड लाख रुपये दिले जाणार आहेत किंवा जखमींचा सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासंदर्भात माहिती दिली. दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेसंदर्भात माहिती दिली. तसेच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये सहकार्य वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.


यासंदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना सुरु केली आहे. त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपाचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे किंवा त्यांच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांच्या आत पोलिसांना अपघाताची माहिती देणे आवश्यक आहे. इतकेच नाही, हिट-अँड-रन प्रकरणांतील मृतांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.



स्कूल बस चालकांसाठी नवे नियम


शाळा आणि महाविद्यालयासमोर वाहतूक नियोजन नसल्याने दरवर्षी जवळपास १० हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू होते, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल बस चालकांसाठीही आम्ही नवे नियम केले आहेत, एकंदरितच प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Nitin Gadkari)

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर