Alibaug Sea : अलिबागच्या समुद्रात मच्‍छीमार बोट बुडाली; १५ खलाशांना वाचवण्यात यश

अलिबाग :  येथील समुद्रात आक्षी साखर भागात 'हिरकन्या' ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी बचावले असले तरी बोट बुडाल्याने तब्बल २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा बोट मालक जगदीश बामजी यांनी केला आहे. दुसऱ्या मच्छीमारी बाेटीतील खलाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून मदत केल्याने १५ खलाशांचा जीव वाचला आहे.




जगदीश बामजी यांच्‍या मालकीची हिरकन्या बोट १५ खलाशांसह मासेमारीसाठी निघाली होती. हिरकन्या'मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकटली. त्यानंतर काही काळाने बोटीत पाणी भरू लागले. कुलाबा किल्‍ल्‍याच्‍या मागील बाजूस बोट अचानक बुडू लागली. ही घटना समोरून येणाऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरडा करून हिरकन्यामधील खलाशांना जागे केले. त्यानंतर त्यांना बोटीत घेतले. मात्र, हिरकन्या बोट बुडाली.

मिळालेल्या माहितीनुसार हिरकन्या बोट बुडाल्याचे कळताच बोट मालक जगदीश बामजी दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचले. मत्‍स्‍यव्‍यवसाय विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी अलिबाग किनारी पोहोचले असून ते बोटीला झालेल्‍या अपघाताची माहिती घेत आहेत. अथक परिश्रमानंतर स्‍थानिकांच्‍या मदतीने अपघातग्रस्‍त बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड