पालघर : राजस्थानमध्ये अजमेर येथील बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घरी परतत असताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आणि चार तरुण गंभीर जखमी झाले. सर्व तरुण पालघर जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.
दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर तरुण कारने घरी परतत होते. त्यांच्या कारचा गुजरातमध्ये भरुच येथील अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. वेगाने येणारी आर्टिगा कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) या तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला. सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भरुचमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. क्रेन आणि गॅस कटर या साधनांचा वापर करून जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात अतिशय भीषण होता. यात कारचा चेंदामेंदा झाला. जे वाचले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे, जीवाला धोका आहे; असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातामुळे मध्यरात्री थोडा वेळ अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. पण वाहतूक पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…