दर्ग्यावर चादर चढवून घरी परतताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू

पालघर : राजस्थानमध्ये अजमेर येथील बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घरी परतत असताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आणि चार तरुण गंभीर जखमी झाले. सर्व तरुण पालघर जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.



दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर तरुण कारने घरी परतत होते. त्यांच्या कारचा गुजरातमध्ये भरुच येथील अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. वेगाने येणारी आर्टिगा कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) या तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला. सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भरुचमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. क्रेन आणि गॅस कटर या साधनांचा वापर करून जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात अतिशय भीषण होता. यात कारचा चेंदामेंदा झाला. जे वाचले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे, जीवाला धोका आहे; असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातामुळे मध्यरात्री थोडा वेळ अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. पण वाहतूक पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा