Nitesh Rane : ७ सागरी जिल्ह्यातील ९ समुद्रकिनाऱ्यांवरून उद्या एकाच वेळी उडणार ९ ड्रोन!

  69

अनधिकृत मासेमारीवर निर्बंध आणि सागरी सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारचे आणखी एक पाऊल


मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती


मुंबई : महाराष्ट्र राज्याला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या एवढ्या मोठ्या समुद्रकिनाऱ्याची गस्त घालणे आणि अनधिकृत तसेच परकीय मासेमारीला प्रतिबंध करणे वाटते तितके सोपे नाही. याबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे अखेरीस राज्य सरकारने अनधिकृत मासेमारीला पायबंध घालण्याकरिता राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील नऊ समुद्र किनाऱ्यांवरून गुरुवारी (दि. ९ डिसेंबर) एकाच वेळी नऊ ड्रोन उडवले जाणार असून त्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.



अनधिकृत मासेमारी आणि सागरी सुरक्षा या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. परराज्यातील अनधिकृत मच्छीमार नौकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून याचा फटका राज्यातील गरीब मच्छीमारांना होत आहे तसेच समुद्र किनाऱ्यावरून अतिरेकी कारवायांची घडामोड झाल्याची याआधीची उदाहरणे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात गंभीरता दाखवली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी आधुनिक प्रणालींचा वापर करून बंदरे आणखीन सुरक्षित करण्याचे योजले आहे. त्यानुसार ड्रोनचा वापर करून समुद्र किनाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.


९ डिसेंबरला १० वाजता सात जिल्ह्यातील ९ समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख प्रणालीचे प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालय येथे कंट्रोल रूम उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन ९ तारखेला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्रात्यक्षिकाच्या दिवशी स्वतः मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहून या नवीन प्रणालीचे प्रात्यक्षिक पाहणार आहेत.



सात सागरी जिल्ह्यांमधून उडणार ड्रोन


राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राज्यातील सात सागरी जिल्ह्यामधून नऊ समुद्रकिनाऱ्यावरून नऊ ड्रोन उडणार आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील शिरगाव, ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोराई, मुंबई शहर जिल्ह्यामधील ससून गोदी, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, साखरी नाटे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या नऊ समुद्रकिनाऱ्यावरून नऊ ड्रोन उडवले जाणार आहेत.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित