Nashik News : नाशिकमध्ये चाललंय तरी काय? लग्नघरी शोककळा, आई-वडिलांनी का केली आत्महत्या?

  115

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ आता नाशिकमध्ये आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


टिळकवाडी परिसरातील शाह कुटुंबात धाकट्या मुलाच्या लग्नसोहळ्याची तयारी सुरू असताना, आई-वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरलं असून, शाह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा विवाह अवघ्या २० दिवसांवर आला होता. त्यामुळे घरात लगीनघाई सुरू होती. काल रात्री शाह दाम्पत्याने मुलासोबत जेवण केले. त्यानंतर पती-पत्नीने विष प्राशन केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. आई-वडिलांच्या अशा टोकाच्या पावलामुळे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


दरम्यान, याच आठवड्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कविता अहीवळे असे त्या महिलेचे नाव आहे. या घटनेनेही नाशिकमध्ये खळबळ उडवली होती.


या घटनांमुळे नाशिकमध्ये आत्महत्या आणि त्यामागील कारणांबद्दल गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना