Satya Nadella : मायक्रोसॉफ्ट भारतात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी येत्या काळात भारतामध्येतब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत घोषणा केली आहे. सोमवारी नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मिडीयावर पंतप्रधानांची भेट आणि कंपनीकडून होणाऱ्या गुंतवणुकी संदर्भात माहिती दिली आहे. सत्या नडेला यांनी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “भारताला एआय -प्रथम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बांधण्यासाठी आणि या एआय प्लॅटफॉर्म शिफ्टचा प्रत्येक भारतीयाला लाभ मिळावा यासाठी देशात आमच्या निरंतर विस्तारावर एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”


बजेटपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्याने बाजारात आनंदाची उसळी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सत्या नडेला, तुम्हाला भेटून खरोखर आनंद झाला! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या बैठकीत टेक, इनोव्हेशन आणि एआयच्या विविध पैलूंवर चर्चा करणे देखील छान होते.” असे नडेला यांनी नमूद केलेय.



“एआयच्या क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी जाहीर करत असलेली गुंतवणूक ही भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानि नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या व्यक्तींना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही