Satya Nadella : मायक्रोसॉफ्ट भारतात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनी येत्या काळात भारतामध्येतब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी याबाबत घोषणा केली आहे. सोमवारी नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मिडीयावर पंतप्रधानांची भेट आणि कंपनीकडून होणाऱ्या गुंतवणुकी संदर्भात माहिती दिली आहे. सत्या नडेला यांनी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले आणि म्हणाले, “भारताला एआय -प्रथम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बांधण्यासाठी आणि या एआय प्लॅटफॉर्म शिफ्टचा प्रत्येक भारतीयाला लाभ मिळावा यासाठी देशात आमच्या निरंतर विस्तारावर एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”


बजेटपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा झाल्याने बाजारात आनंदाची उसळी येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांच्या भेटीनंतर मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सत्या नडेला, तुम्हाला भेटून खरोखर आनंद झाला! मायक्रोसॉफ्टच्या भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार आणि गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेऊन आनंद झाला. आमच्या बैठकीत टेक, इनोव्हेशन आणि एआयच्या विविध पैलूंवर चर्चा करणे देखील छान होते.” असे नडेला यांनी नमूद केलेय.



“एआयच्या क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी जाहीर करत असलेली गुंतवणूक ही भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानि नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या व्यक्तींना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव