Health: थंडीत दररोज खा या ३ प्रकारच्या बिया, शरीर राहील उबदार आणि त्वचा होईल मुलायम

  46

मुंबई: थंडीच्या दिवसांत शरीराला हेल्दी राखणे कठीण असते. यादरम्यान थोडासा जरी हलगर्जीपणा केला तर आजारांना आमंत्रण मिळू शकlते. अशातच या मोसमात आपल्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश जरूर केला पाहिजे जे शरीराला आतून पोषण देतील आणि शरीर उबदार ठेवतील. थंडीच्या दिवसांत काही बियांचे सेवन लाभदायक ठरते.


बिया आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. खासकरून थंडीच्या दिवसांत याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते तसेच शरीरही उबदार राहते.


या बियांचे सेवन तुम्ही कच्च्या रूपात करू शकता. अथवा हे भिजवून अथवा भाजून खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरतात. कारण असे केल्याने त्यातील पोषकतत्वे अवशोषित करण्यास मदत मिळते.



अळशीच्या बिया


अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच हृदयासाठीही अतिशय फायदेशीर असते. अळशीच्या बियांमध्ये हेल्दी फॅटी अॅसिड असते जे आपल्या त्वचेसाठी चांगले असते. तुमच्या त्वचेसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. कारण अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन ई असते यामुळे कोलेजनचे उत्पादन होण्यास मदत होते तसेच त्वचा दीर्घकाळ तरूण राहते.



चिया सीड्स


चिया सीड्स वेट लॉसमध्ये जितके प्रसिद्ध आहे तितकेच स्किनसाठी अतिशय फायदेशीर आहे. चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट, फ्री रॅडिकल्स असतात तसेच हृदयाचे आरोग्य आणि कॅन्सरपासून बचाव होतो. चिया सीड्समध्ये फायबर असल्याने वजन घटवण्यास मदत होते. तसेच पाचन तंदुरुस्त राहते. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे मिनरल्स असतात यामुळे हाडे मजबूत बनतात.



भोपळ्याच्या बिया


भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. कारण यात अँटी ऑक्सिडंट, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स असतात. यामुळे नुकसान होते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे