Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के

नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, सिक्कीम, आसाम आणि बंगालसह भारतातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तिब्बतमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.


बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझ्झफरपूरमध्ये सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारासा भूकंपाचे धक्के जाणवले. माल्दासह उत्तर बंगालच्या काही भागांमध्ये तसेच सिक्कीमध्येही हे धक्के जाणवले. असे सांगितले की पाच सेकंदापर्यंत धरती हलत होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ते आपल्या घरातून बाहेर निघाले.


 

नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचे केंद्रबिंदु नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ शिजांगमध्ये होते.





नेपाळ सरकारचा दुजोरा


नेपाळ सरकारनेही मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये भूकंप आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जमीन हलताना दिसत आहे. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची बातमी नाही.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू