Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के

नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, सिक्कीम, आसाम आणि बंगालसह भारतातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तिब्बतमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.


बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझ्झफरपूरमध्ये सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारासा भूकंपाचे धक्के जाणवले. माल्दासह उत्तर बंगालच्या काही भागांमध्ये तसेच सिक्कीमध्येही हे धक्के जाणवले. असे सांगितले की पाच सेकंदापर्यंत धरती हलत होती. लोकांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर ते आपल्या घरातून बाहेर निघाले.


 

नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचे केंद्रबिंदु नेपाळ-तिबेट सीमेच्या जवळ शिजांगमध्ये होते.





नेपाळ सरकारचा दुजोरा


नेपाळ सरकारनेही मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये भूकंप आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जमीन हलताना दिसत आहे. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची बातमी नाही.

Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक