देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद नष्ट करू - अमित शाह

छत्तीसगडमधील आयईडी ब्लास्टनंतर दिली प्रतिक्रिया


नवी दिल्ली : भारतातून मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करून असा पुनरूच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडात सोमवारी झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये ८ जवान आणि एक वाहन चालक असा 9 जणांचा बळी गेला. या घटनेवर शाह यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.

नक्षलवाद्यांच्या विरोधात संयुक्‍त मोहिम राबवून परतताना दंतेवाडामध्‍ये नक्षल्यांनी घातपात घडवला. स्थानिक कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. हा भ्याड हल्ला सोमवारी दुपारी २.१५ वाजता झाला. यामध्ये दंतेवाडा डीआरजीचे ८ जवान आणि एक ड्रायव्हर यांना वीर मरण आले.


या घटनेसंदर्भात ट्विटरवर (एक्स) प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील बिजापूर येथे झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. पण आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. तसेच मार्च २०२६ पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००