Manmad Accident : मनमाडला दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून मृत्यु...!

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनमाड येथील चांदवड रोडवर धावत्या ट्रकखाली सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड येथील चांदवड रोडवर पाटील गॅरेज समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटारसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटारसायकल वरील आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला यामुळे यांची ओळख पटने देखील शक्य नाही त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.



मोकाट जनावरे आणि रोजची वाहतुक कोंडी मुळे अपघात..!


मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही याबाबत दखल घेत नाही याशिवाय चांदवड रोड मालेगाव रोड व येवला रोड या महामार्गावर मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते यामुळे देखील रोज अपघात होत असतात आजही मोकाट जनावरामुळे दोन शाळकरी मुलाचा जीव गेला आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८