भारतातील 'या' राज्यांमध्ये आढळले HMPV चे तीन रुग्ण

नवी दिल्ली : भारतात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus – HMPV) बाधीत तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकमधील बंगळुरू येथे बाप्टिस्ट रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण गुजरातमधील अहमदाबादच्या ऑरेंज रुग्णालयात उपचार घेत आहे. बाप्टिस्ट रुग्णालयात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा उपचार घेत आहेत तर ऑरेंज रुग्णालयात दोन महिन्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. खासगी लॅबच्या अहवालांआधारे तिन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप सरकारी लॅबने या प्रकरणांमध्ये अहवाल दिलेला नाही. देशात तीन मेटान्यूमोव्हायरसबाधीत रुग्ण आढळताच सर्व राज्यांची सरकारी यंत्रणा जागी झाली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस संदर्भात खबरदारीचे उपाय करण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रात अद्याप ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत एकही रुग्ण आढळलेला नाही. पण खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लवकरच उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारनेही खबरदारीचे उपाय करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सध्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरसबाधीत सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात थेट प्रवेश देऊ नये. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात लवकरच केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी – जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी – खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर तब्येतीची काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने नागरिकांना केले आहे.

हे करा

खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडासमोर हातरुमाल, टिश्यू पेपर धरा
बाहेरून आल्यावर तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर, लिक्विड सोप किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर अथवा साबण आणि पाणी यांचा वापर करून हात स्वच्छ धुवा
ताप, सर्दी, खोकला, शिंका अशा स्वरुपाचा त्रास वारंवार होत असल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करा आणि गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कने नाक – तोंड झाकून घ्या.
पुरेसे पाणी प्या. सकस आहार घ्या.
वास्तव्याच्या आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची खबरदारी घ्या.

हे करू नका

हस्तांदोलन
हातरुमाल, टिश्यू पेपर यांचा पुनर्वापर
रुग्णाशी जवळचा संपर्क
डोळे, नाक, तोंड यांना वारंवार स्पर्श करणे
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
वैद्यकीय सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार करणे
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने