Palghar : पालघर हादरलं!

डहाणूत भूकंपाचे तीन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


पालघर : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात (२०१८)पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झालेत. पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे.




पालघर जिल्ह्यात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. याधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसराला ३१ डिसेंबर २०२४ दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाले.याआधीही ऑगस्ट २०२४ आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये डहाणू तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले होते.

Comments
Add Comment

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन