Ravina Tandon Daughter : रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी करतायत कौतुक!

मुंबई : बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलं आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, आमिर खानचा मुलगा जुनैद खान, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर अशा नामांकित कलाकारांच्या मुलांनी आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. कलाकारांप्रमाणे त्यांची मुलेही तितकीच चर्चेत असतात. अशातच आता रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी कौतुकच करत आहेत. तिची थेट तुलना सुहाना खान, खुशी कपूरसह कतरिना कैफबरोबर करत आहेत.



रवीना टंडनची मुलगी राशा थडानी अवघ्या १९ वर्षांची आहे. तिच्या जबरदस्त डान्सने तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ती ‘आजाद’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. याच चित्रपटातील तिचं पहिलं गाणं ‘उई अम्मा’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावर राशाचा डान्स पाहून नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. तिने आपल्या डान्ससह अदाकारीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.


?si=eaDvTxzt0RvrlcG1

अभिनेत्री राशा थडानीचं ‘उई अम्मा’ गाणं ४ जानेवारीला प्रदर्शित झालं. मधुबंती बागने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्यातील जबरदस्त डान्समुळे राशावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.