धाराशिवमध्ये पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी, चौघांचा मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी पेढी परिसरात पारधी समाजाच्या दोन गटात मध्यरात्री शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. या प्रकरणात येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून दहा जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे.



मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. हत्या, बेदम मारहाण करणे, लैंगिक अत्याचार, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडणे, चोऱ्या, खंडणी वसुली, अपहरण हे प्रकार वाढले आहेत. यात बावी पेढी परिसरातील घटनेची भर पडली आहे.



शेतात पाणी देण्यावरून हाणामारी झाली. या हाणामारीत चार जणांना जीव जाईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर बावी पेढी परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाण प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून