भारतातील पहिले दोन HMPV बाधीत रुग्ण बंगळुरूत

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथून एक चिंताजनक बातमी आली आहे. भारतातील पहिले दोन ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus - HMPV) बाधीत रुग्ण बंगळुरूत आढळले आहेत.

तापामुळे आठ महिन्यांच्या मुलाला बाप्टिस्ट रुग्णालयात दाखल केले आहे. खासगी लॅबमध्ये नमुने तपासल्यानंतर मुलाला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्याचे लक्षात आहे. सरकारी प्रयोगशाळेने नमुने तपासलेले नाहीत. रुग्णावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राज्याचा आरोग्य विभाग आणखी माहिती घेत आहे.

बंगळुरूच्या बाप्टिस्ट रुग्णालयात तीन महिन्यांच्या चिमुरडीलाही दाखल केले आहे. या मुलीला आधीपासूनच ब्राँकोन्यूमोनयाचा त्रास होता. आता या चिमुरडीला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली आहे. या चिमुरडीचे नमुने पण अद्याप सरकारी लॅबने तपासलेले नाहीत. या प्रकरणातही राज्याचा आरोग्य विभाग आणखी माहिती घेत आहे.



दोन्ही मुलांना ज्या विषाणूची बाधा झाली आहे तो चीनमध्ये आढळलेला ह्युमन मेटान्यूमोव्हायरसच आहे का याची माहिती अद्याप कर्नाटक सरकारने दिलेली नाही. ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची कमी - जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो.



सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटान्यूमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी - खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात