बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, ४५९० पानी आरोपपत्र दाखल, २१० साक्षीदार

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सदस्य असलेल्या बाबा सिद्दीकींची ऑक्टोबर २०२४ मध्ये हत्या झाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act - MCOCA) न्यायालयात २६ अटकेतील आणि तीन फरार असलेल्या आरोपींच्या विरोधात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तपासाआधारे पोलिसांनी २१० साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आरोपपत्रात केली आहे. पोलीस अद्याप झीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई या तीन आरोपींना शोधत आहेत.



बिश्नोई टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी आरोपपत्राद्वारे केला आहे. सलमानचे हितचिंतक असल्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न बिश्नोई टोळीने केला. प्रत्यक्षात फरार असलेल्या झीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई या तीन आरोपींनी बिश्नोई टोळीला मुंबईत पाय पसरणे सोपे व्हावे यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.



आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा थेट उल्लेख नाही. आरोपी, फरार आरोपी अशा कोणत्याही स्वरुपात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा आरोपपत्रात उल्लेख दिसत नाही. यामुळे लॉरेन्स बिश्नोईचा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी अप्रत्यक्षरित्या संबंध असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे तीन कारणं असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. सलमानशी असलेली जवळीक, अनुज थापनच्या आत्महत्येचा बदला आणि बिश्नोई टोळीचा प्रभाव निर्माण करणे या तीन कारणांसाठी बाबा सिद्दीकींच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस